September 9, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यातील शेंद्रीच्या गाव तलावामुळे वस्तीमधील लोकांना धोका

बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी तालुक्यातील शेंद्री येथील गाव तळ्याचा भराव खचून अनेक महिन्यांचा कालावधी उलटून जाऊन व याबाबत जिल्हा जलसंधारण अधिकारी सोलापूर यांना वारंवार लेखी निवेदने देऊनही या तलावाच्या दुरुस्तीकडे संबंधित वरिष्ठ प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे गाव तलावा शेजारील रहिवासी वस्ती मधील लोकांचे जीव धोक्यात आले आहेत. तरी याबाबत प्रशासनाने तातडीने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे .

Advertisement

Village lake at Shendri in Barshi taluka poses a threat to the people in the settlement
याबाबत अधिक माहिती अशी की शेंद्री येथील गाव तलावाचा भराव ऑक्टोंबर 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टी मध्ये खचलेला आहे. याबाबत शेंद्री ग्रामपंचायती सह तालुक्याचे लोकप्रतिनिधी आ. राजेंद्र राऊत यांनीही मार्च 2021 मध्ये तलावाची तातडीने दुरुस्ती करावी असे लेखी पत्र संबंधित विभागाला दिले होते. मात्र दोन्ही पत्रांकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष करून याबाबत उचित कार्यवाही करण्याचे टाळले असल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास येत आहे.  पावसाळ्याच्या अंतिम टप्प्यात बार्शी तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेंद्री येथील खचलेला  गाव तलाव धोक्याच्या वाटेवर आहे. तो तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून त्या तलावातील पान्याने भरावाला धोका निर्माण झाल्यास गावामध्ये पाणी घुसून  मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गाव तलावाच्या लगतच असलेल्या वस्तीमध्ये पाणी घुसून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही.
याबाबत वारंवार लेखी तोंडी निवेदने देऊनही संबंधित विभाग याकडे  दुर्लक्ष करत आहे याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. संबंधित विभाग एखाद्या दुर्घटनेची तर वाट पाहत नाही ना असा प्रश्न या  गावातील व गाव तलाव परिसरात राहणाऱ्या  संतप्त नागरिकांमधून विचारला जात आहे.  अतिवृष्टी होऊन गाव तलाव खचण्याच्या  घटनेला तब्बल अकरा महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. तरीही संबंधित विभागाला अथवा त्यांच्या अधिकार्‍यांना या तलावाच्या समस्येकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही. हा विभाग कधी जागा होणार असा प्रश्न शेंद्री येथील  रहीवाशांमधून विचारला जात आहे.

प्रतिक्रिया;
#मच्छिंद्र सोनवणे( उपविभागीय अधिकारी ल.पा.विभाग,बार्शी) ;
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर निधी उपलब्ध नसल्यामुळे दुरुस्तीचे काम प्रतिक्षेत आहे.निधी उपलब्ध झाल्यानंतर प्राधान्याने हे काम हाती घेतले जाईल

Leave a Reply