September 27, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

युवकांनी शेतीपुरक व्यवसाय करावे; पवार

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

ग्रामीण भागातील युवकांनी शिक्षणानंतर शेतीपूरक उद्योगांमध्ये उतरलं पाहिजे तरच महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो असे प्रतिपादन राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव पवार यांनी बोलताना व्यक्त केले. ते पिंपळवाडी ता. बार्शी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या युवकांच्या उद्योजगता मेळाव्यामध्ये बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रमेश चौधरी उपस्थित होते.
   पवार पुढे बोलताना म्हणाले की प्रदेशांमध्ये अनेक लोक नोकरीपेक्षा स्वतःचा शेतीपूरक लहान-मोठे व्यवसाय करत असतात. शेतात उत्पादित होणार्‍या मालावर प्रक्रिया करत असतात तसेच पशुपालन वर आधारित वेगवेगळ्या पद्धतीचा व्यवसाय ते करत असतात शेळी पालन दुग्ध व्यवसाय पोल्ट्री उद्योग प्रक्रिया उद्योग गांडूळ खत यासह नर्सरी मत्स्य व्यवसाय यासह अनेक उद्योगांची माहिती आणि शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती या कार्यक्रमामध्ये त्यांनी दिली यावेळी गावातील तरुण महिला बचत गटातील सदस्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि यामध्ये प्रक्रिया उद्योग आणि पशुपालन यामध्ये नाविन्यपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा असेही प्रतिपादन त्यांनी बोलताना केले.
भविष्य काळामध्ये पद्धतीची शेती आणि वेगवेगळ्या प्रक्रिया उद्योगाला चांगली मागणी असणार आहे असे त्यांनी बोलताना सांगितले शासनाच्या विविध योजना याला किती मदत करत असतात अशा शासनाच्या सर्व योजनांची माहिती त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिली.

Young people should do agri-business; Pawar
कार्यक्रमासाठी दत्तात्रय चौधरी,ग्रामपंचायत सदस्य अजमुद्दिन मुलांनी, सपना चौधरी आदी उपस्थित होते  आभार प्रदर्शन आणि सूत्रसंचालन जयाजीराव देशमुख यांनी केले

Leave a Reply