..तर मंत्रालय किंवा कृषी आयुक्तालयात तीव्र आंदोलन करणार…शंकर गायकवाड(व्हिडिओ/News)

पुणे; महाराष्ट्र स्पीड न्युज
नुकतेच शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे येथे पिकविमा कंपन्या व कृषी आयुक्तालयावरील आंदोलनानंतर शासन खडबडून जागे झाले व मागणी प्रमाणे संपूर्ण राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पिकविमा मंजूरीचे आदेश काढले परंतु विमाभरपाई १५ एप्रिलच्या आत हेक्टरी काढनी पुर्व १६७०० तर काढनी नंतरच्या नुकसानीसाठी २७५४० रू. देण्याचे आश्वासन दिल्याप्रमाणे जर शेतकऱ्यांच्या खातेवर जमा केले नाही तर १६ एप्रिल रोजी मंत्रालय किंवा कृषी आयुक्तालयात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी सांगीतले.तसेच ज्या शेतकऱ्यांना यापुर्वी विमा कमी मिळाला किंवा मिळालाच नाही आशा राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी संपर्क करू १६ एप्रिलच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.